
नवी दिल्ली, ११ फेब्रुवारी (पीटीआय) गुजरातमधील वलसाड येथील ३६ किमीपेक्षा अधिक आणि नवसारीतील २४ किमी किनारपट्टीवर १९९० ते २०२२ दरम्यान विविध स्तरांवर धूप झाली असल्याची माहिती सरकारने बुधवारी संसदेत दिली.
ही माहिती पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत भाजपचे खासदार धवल लक्ष्मणभाई पटेल यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना दिली.
एनसीसीआरच्या अहवालानुसार ६२.७८ किमी वलसाड किनारपट्टीपैकी २.५ किमी उच्च धूप, ३.२४ किमी मध्यम धूप आणि ३०.८८ किमी कमी धूप नोंदवली गेली.
४०.८८ किमी नवसारी किनारपट्टीवर ३.८६ किमी उच्च, ४.६ किमी मध्यम आणि १६.१८ किमी कमी धूप झाली आहे.
उदवाड्याच्या उत्तरेकडील भाग उच्च धूप क्षेत्रात तर भगाल किनारपट्टी मध्यम धूप क्षेत्रात वर्गीकृत आहे.
